Friday, August 2, 2013

श्लोक १८५

II श्रीराम समर्थ II

लपावे अति आदरे रामरुपी।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी॥
कदा तो जनी पाहतांही दिसेना।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना॥१८५॥
 


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

सद्गुरू कडून आत्मज्ञान झाले तरी निराकार आत्मस्वरूपावर बोलण्याने प्रेम जडणे कठीण असते .त्यासाठी सगुणाचा आधार घ्यावा लागतो .म्हणून समर्थ सांगतात अतिशय आदराने भयाच्या पलीकडे असणा-या प्रेमाने इतका बुडून जा की तू तुझा राहू नकोस .तुझा मी पणा सोड भीतीने घाबरून प्रेम करण्यापेक्षा निर्भय हो आणि राम रूपात रंगून जा . मी कर्ता न मानता राम कर्ता मान मग तुझा मी पणा नाहीसा होईल .मग आत्मस्वरूपात लीन होशील .मग देहाने रामाचा दास झालास तरी जीवाभावाने आत्माराम होशील .मग असा माणूस जनसंपर्कात सतत रहात नाही .जेव्हा जनसंपर्कात असतो तेव्हा सामान्य माणसा सारखा असतो .पण अंतरी मात्र स्वस्वरुपाशी अनुसंधानात असतो .

lochan kate said...

श्लोक१८५.............
लपावे अती आदरे राम रुपी |
भयातीत निश्चित ये स्वरुपी ||
कदा तो जनी पाहतां ही दिसेना |
सदा ऐक्य तो भिन्न भावे वसेना ||१८५||
हिन्दी में .....
रहो अंतर में सदा राम स्वरुपा |
भयातीत नाहो निश्चय स्वरुपा ||
कभी वो जनों को देखे दिखे ना |
सदा ऐक्य वो भिन्न भाव वसे ना ||१८५||
अर्थ...... श्री समर्थ रामदास स्वामी कहते है कि हे मानव मन! अत्यंत आदर के साथ राम स्वरुप में लीन होना चाहिये | क्योंकि संसार रुपी भय के उस पार सद् स्वरुप है | मनुष्यके देखनें से कदापि वह सद् स्वरुप दिखाई नही देता है | सदैव एक ही भाव मेंवो बसते हैं , अर्थात् सद् स्वरुप का कोई भी हिन्न भाव नही है |