Friday, December 7, 2012

श्लोक १५१

II श्रीराम समर्थ II

 खरें शोधितां शोधितां शोधिताहे।
मना बोधिता बोधिता बोधिताहे॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥
 
डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १५१....
खरे शोधितां शोधिता शोधिता हे |
मनां बोधितां बोधितां बोधता हे ||
परी सर्व ही सज्जनांचेनि योगे |
बरा निश्चयो पाविजे सानुरागे ||१५१||
हिन्दी में ....
सत्य ढुंढते ढुंढते ढुंढ्ते ही रहो |
मन आत्मबोध आत्म ज्ञान दे हो ||
पर सज्जनों की क्रुपा जो बरसती |
तभी द्रुढ निश्चय सिढी है चढती ||१५१||
अर्थ...
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! सत्य को ढूंढने से , जानने से या पहचानने से सत्य का ज्ञान प्राप्त होता है | ऐसे ही मन को ज्ञान देने से , उसकी पहचान से ,ज्ञान प्राप्त होता है और प्रेमपूर्वक व्यवहार करने से एवं सज्जन लोगों की संगति के योग से ही शाश्वतता की पहचान होती है | अत: सज्जनों की संगति में रहना चाहिये | जिससे प्रेमपूर्वक व्यवहार से सत्य के समीप पहूंचने में आसानी होती है |

suvarna lele said...

बरे म्हणजे आस्थेने ,कळकळीने ,या ज्ञेय वस्तूचा विचार केला तर प्रतिकूल विचार
बाजूला जातात .अनुकूल विचार मनात येण्यास ,स्थिरावण्यास मदत होते .शाब्दिक
ज्ञान झाले की मनाला बोध करता येतो .आत्मा कोण ,अनात्मा कोण ,नित्य काय ,
नित्य काय ,अनित्य काय हे समजायला लागते .सार काय ,असार काय हे मनाला
पटायला लागते .ते पटायला लागेल की विचार प्रगल्भ व्हायला लागतात .विवेक करता
यायला लागतो ,विवेकासाहित वैराग्य निर्माण होते .आणि असा अनुभव येतो की मी
तोच आहे ,मीच ती सद्वस्तु आहे ..
ओं हे सगळे होण्यासाठी सज्जन संगती मात्र हवी .त्यासाठी बरा निश्चय त्या
शाश्वताचा करायला हवा .सज्जन संगतीने संदेह नाहीसा होतो .सज्जनाची सेवा
आवडीने केली प्रेमाने ,म्हणजे सानुरागे केली सज्जन त्याला आपला म्हणतो .आणि
मग त्यांचा उध्दार होतो .समर्थ म्हणतात – सद्गुरू कृपा तेचि किली | जेणे बुद्धी
प्रकाशली | द्वैत कपाटे उघडली | येकसरी ||
७-२-१५ ||