Friday, April 27, 2012

श्लोक १२०


II श्रीराम समर्थ II

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण
विधीकारणे जाहला मत्स्य वेगीं।
धरी कूर्मरुपे धरा पृष्ठभागी।
जनारक्षणा कारणे नीच योनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी॥१२०॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १२०....
विधी कारणे जाहला मत्स्य वेगी |
धरी कूर्म रुपे धरा प्रुष्ठ भागी ||
जना रक्षणा कारणे नीच योनि |
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ||१२०||
हिन्दी में....
हुआ अवतरण भाग्य से मत्स्य रुप का |
धरा को रखा प्रुष्ठ में कुर्म रुप सा ||
जनों की रक्षा को सही नीच योनि |
न उपेक्षी कभी देव भक्ताभिमानि ||१२०||
अर्थ...
श्री राम चन्द्र जी कहते है कि हे मनुष्य ! विधी लिखित जीवन होने के कारण श्री हरि को भी ब्रह्मा के कारण मत्स्य रुप लेना पडा | कुर्म रुप में पीठ पर रखना पडा | अत: भक्तों के लिये नीच योनि में वराह रुप भी धारण किया | अत: भगवान भक्त का सदैव अभिमान ही करते है | उसकी उपेक्षा कभी भी नही करते |

suvarna lele said...

या श्लोकात मत्स्य ,कूर्म , वराह या नीच योनीतील अवतारांचे वर्णन आहे .विधी म्हणजे ब्रह्मदेव कल्प काळी ब्रह्मदेव निद्रा घेत असताना हयग्रीव दैत्याने त्यांच्या मुखातील वेद हरण केले व समुद्रात नेले .भगवंताने त्या दैत्याला मत्स्य रूप घेऊन ठार मारले व ब्रह्मदेवासाठी वेद परत आणून दिले .
कुर्मावतारात भगवंतानी आपल्या पाठीवर पृथ्वी धारण केली .समुद्रमंथनाच्या वेळेस मंदार पर्वत खाली खाली जाऊ लागली .तो बुडतो की काय अशी देवांना चिंता वाटू लागली . तेव्हा भगवंतांनी भव्य कासवाचे रूप घेतले तो पर्वत आपल्या पाठीवर धारण केला .देवांना अमृत प्राप्त करून देण्यात सहाय्य केले .
भूदेवीला दैत्यांनी समुद्रात ओढून नेले म्हणून तिला वर काढण्यासाठी उग्र वराह रूप धारण केले .[स्कंद ३ अध्याय १३ ] मध्ये ही कथा आहे .