Friday, February 10, 2012

श्लोक १११

II श्रीराम समर्थ II

हिताकारणे बोलणे सत्य आहे।
हिताकारणे सर्व शोधुनि पाहें॥
हितकारणे बंड पाखांड वारी।
तुटे वाद संवाद तो हीतकारी॥१११॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १११....
तु टे वाद संवाद त्याते म्हणावे |
विवेके अहंभाव याते जिणावे ||
अहंता गुणे वाद नाना विकारी
तुटे वाद संवाद तो हितकारी ||१११||
हिन्दी में....
हित के लिये बोलना सत्य होता |
हित के लिये सार ही सत्य होता ||
हित के लिये बंड पाखंडी हारी |
छुटे वाद संवाद वो हितकारी ||१११||
अर्थ...
श्री राम दास जी कहते है कि हे मनुष्य ! किसी भी व्यक्ति का भला करने के लिये सच बोलना हितकारी है दूसरे के हित के लिये सम्पूर्ण विचार करके बोलना चाहिये | जो व्यक्ति पाखण्डी या नास्तीक होता है उसके विरुध्द उसे समझाकर उसके हित में कार्य हो ऐसी बात करना चाहिये | श्री समर्थ रामदास जी मनुष्य को समझाते हुए कहते हैं कि जिस स,ंवाद से विवाद दूर होता हो उसी प्रकार की बात करना चाहिये | वही बात मनुष्य के लिये हितकर है |

suvarna lele said...

हे मना ,तुझे कल्याण व्हावे म्हणून तुला खरे सांगितले खरे काय ?तुझे कल्याण होण्यासाठी तू वासनांना न चिकटता ,आत्मारामाचे चिंतन कर .इतर विषयांना चिकटू नकोस .राघवा शिवाय दुसरे काही बोलू नकोस .रामाशिवाय दुसरे काही बोलून उपयोग नाही .
तुझे अनहित कशात आहे तर राघवाच्या चिंतना शिवाय तू जो काळ घालवशील ,तो काळ तुझे अनहित करणारा आहे .कारण राघवाच्या स्मरणाशिवाय केलेली कोणतीही गोष्ट तुझे अनहित करणारी आहे .
तुझे विश्रांतीचे स्थानही राघवच आहे .त्यामुळे तूच विचार कर ,तू खरे काय ,खोटे काय ,शाश्वत काय अशाश्वत काय याचा विचार कर .तुझे हित कशात आहे ते नीट पहा .
म्हणून अशास्त्रीय ,नास्तिक विचारांचा पगडा मनावर ठेउन काहीतरी अशास्त्रीय बोलू नकोस .सज्जन लोक वेड प्रमाण मानतात तर पाखांड लोक कांहीच प्रमाण मानत नाहीत .पाखांड विचारांनी देहबुद्धी दृढ होते वाद वाढतो ,म्हणून तो टाळ .हितकारी संवाद कर