Friday, May 6, 2011

श्लोक ७१

II श्रीराम समर्थ II

जयाचेनि नामे महा दोष जाती |
जयाचेनि नामे गति पाविजेति ||
जयाचेनि नामे घडे पुण्य ठेवा |
प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||७१||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण



जय जय रघुवीर समर्थ !

4 comments:

suvarna lele said...

या श्लोकात राम नामाने काय काय होते टे समर्थ सांगतात .नामाने महादोष जाती असे समर्थ सांगतात .मानवी शरीर म्हणजे दोषाचे भांडारच असते .महादोष असतात ते षडरिपु –काम ,क्रोध ,लोभ ,मोह ,मद ,मत्सर ! काम सर्व दोषाचे मूळ आहे कामातून वासना ,एखादी गोष्ट मिळविण्याची ईच्छा ,ती गोष्ट मिळाली नाही की येणारा क्रोध ,त्या गोष्टीचा मोह ,ती वस्तू मिळाली की ती गोष्ट कायम आपल्याकडेच रहावी असा त्या वस्तूचा लोभ ,ती गोष्ट आपल्या काडीन दुस-या कडे गेली की त्याच्या विषयी वाटणारा मत्सर ह्या सर्व गोष्टी एकां कामा मुळे होतात .हे सगळे दोष नित्य नेमाने नाम घेतल्याने नाहीसे होतात .
नित्य रामनाम घेतल्याने उत्तम गती मिळते गती म्हणजे अवस्था .प्रत्येक साधकाचा जसा अभ्यास असेल तशी त्याला गती मिळते .नाम जितक्या उत्कट पणे घेतले जाते ,तशी भगवद कृपा वाढते ,ज्ञानाचा उदय होतो ,अज्ञान नाहीसे होत जाते .त्याला त्याच्या अधिकारा प्रमाणे मुक्ती मिळतात .
तुकोबांसारखा एखादा सदेह वैकुंठात जातो .त्यावेळेस त्याचे पूर्वजही उद्धरून जातात .अज्ञान नाहीसे झाल्यावर एखाद्याला सायुज्य मुक्ती हवी असेल तर तो परब्र्ह्मात विलीन होतो
जर एखाद्याची भक्ती त्याला सायोज्य मुक्ती मिळण्या एव्हडी झाली नसेल ,त्याने घेतलेले नाम वाया जात नाही त्याने घेतलेले नाम त्याच्या सूक्ष्म देहात सुरक्षित असते .जेव्हा पून्हा नरदेह मिळतो ,तेव्हा मागील जन्मात घेतलेले मान त्याच्या उपयोगी पडते .दुस-या जन्मात त्याच्या कडून निष्काम भजन घडते .
म्हणूनच समर्थ म्हणतात -प्रभाते मनी राम चिंतीत जावा

Kalyan Swami said...

As stated by Loachan Kate...श्लोक ७१..
[हिन्दी में]
महादोष जाते है जिसके नाम से रे |
पाता गति है तु उसके नाम से रे ||
प्रभात में कर तु राम चिंतन मन से रे ||७१||
अर्थ.... श्रीरामदासजी कहते है कि हे मनुष्य मन ! जिसका सिर्फ़ नाम लेने से जीवन में हमारे महा दोषों का निवारण होता है , जिसके नामस्मरण से गति आ जाती है , जिसका नाम लेने से प्रत्यैक क्षण में पुण्य पून्जी रुप में जमा हो जाता है | ऐसे श्री राम चन्द्र जी का प्रात: में स्मरण , चिंतन करते रहना चाहिये |

lochan kate said...

श्लोक ७१
मी एक लाईन विसरले............
[हिन्दी मे]
महादोष जाते है जिसके नाम से रे |
पाता गति है तु नाम लेने से रे ||
पुण्य है मिलता जिसके नाम से रे |
प्रभात में कर राम चिन्तन मन से रे||७१||

lochan kate said...

श्लोक ७१
मी एक लाईन विसरले............
[हिन्दी मे]
महादोष जाते है जिसके नाम से रे |
पाता गति है तु नाम लेने से रे ||
पुण्य है मिलता जिसके नाम से रे |
प्रभात में कर राम चिन्तन मन से रे||७१||