Friday, November 22, 2013

श्लोक २०१

||श्रीराम समर्थ ||

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।
मनी मानसी द्वैत काही वसेना॥
बहूता दिसा आपली भेट जाली।
विदेहीपणे सर्व काया निवाली॥२०१॥

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक २०१.....
कदा ओळखीमाजि दुजे दिसेना |मनी मानसी द्वैत काही वसेना ||
बहुता दिसा आपली भेट जाली
|
विदेही पणे सर्व काया निवाली ||२०१||
हिन्दी में....
कभी सोचो तो कोई दुजा दिखेना |
द्वैत मन का कही भी ठहरे ना ||
बहूत देर से अपनी भेंट होती |
ये सारी काया विदेही हो जाती ||२०१||
अर्थ...
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अंत समय में उन श्रीराम के बिना न दूसरा कोई किखाई देता है न पहचान में आता है और मन में द्वैत कुछ भी नही रहता | ऐसा लगता है हे राम ! बहुत समय पश्चात हमारी भेंट हुई है और ऐसा सोचते - सोचते तक काया का अन्त हो जाता अर्थात जन्म का अन्त हो जाता है | इसलिये सतत पर्मेश्वर का ध्यान करके अपने जीवन को सार्थक करे |

suvarna lele said...

जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो ,सर्वत्र रामरूपच दिसते .त्यावेळेस यापूर्वी पाहिलेले इतर दृश्य विश्व दिसतच नाही .जसे गोपींना सर्वत्र श्रीकृष्ण रूपच दिसत होते .त्यामुळे कोठेच दुजेपणा नव्हता .सर्वत्र मी च रामरूप दिसते .याचे कारण प्रचीती घेणारा जो ज्ञाता असतो तो द्न्येयात म्हणाजे ज्याची प्रचीती घ्यायची आहे त्याच्याशी समरस होतो म्हणजे साधक त्या परब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो .त्यामुळे त्याच्या मनात द्वैत उरत नाही .मी पणा म्हणजे देहबुद्धी असली की मी तू असे द्वैत असते .स्वस्वरुपाशी परब्र्ह्माशी एकरूप झाल्यावर मी पण लोपते आणि द्वैत संपते .
बहुता दिसा आपुली भेटी झाली असे समर्थ म्हणतात .खरे तर अंतरात्मा आणि मी एकच .आणि अंतरात्मा हा त्या परब्रह्माचा अंश .पण अनेक जन्मात या गोष्टीचा विसर पडला होता त्यामुळे मी परब्रह्माशी एकरूप होऊ शकला नव्हता . साधक ब्रह्मस्वरूप झाल्यावर असे म्हनारो की बहुता दिसा आपुली भेटी झाली .
देहबुद्धी संपल्या मुळे देहावस्था संपली आणि विदेहावास्था प्राप्त झाली .आननी आनंदाचा अनुभव घेऊन काया धन्य झाली .