Friday, February 15, 2013

श्लोक १६१

II श्रीराम समर्थ II 

अहंतागुणे सर्वही दुःख होते।
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते॥
सुखी राहता सर्वही सूख आहे।
अहंता तुझी तुंचि शोधुन पाहे॥१६१॥


जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक १६१ ...
अहंता गुणे सर्व ही दु:ख होते |
मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ||
सुखी राहतां सर्व ही सूख आहे |
अहंता तुझी तूंचि शोधुनि पाहे ||१६१||
हिन्दी में .....
अहं भाव से सब ओर दु:ख होता |
बोला मुख से ज्ञान व्यर्थ जाता ||
सुखी रहते ही सर्वत्र सुख होता |
अहंभाव तेरा तुही छोड सकता ||१६१||
अर्थ.....
श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन ! अहंकार के कारण मनुष्य को सब ओर से सिर्फ़ दु:ख ही प्राप्त होता है क्योंकि अहंकारी मनुष्य के बोलने की ओर भी किसी का ध्यान नही रहता | सुखी व संतुष्ट प्रव्रुत्ति से रहने से सर्वत्र आनंद एवं सुख ही प्राप्त होता है | अत: मनुष्य को अपनी अहंभाव की व्रुत्ति को स्वयं ही ढूंढ कर उसे छोडने का प्रयत्न करना चालिये |

suvarna lele said...

अहंकार सोडल्याशिवाय स्वरूपस्थिती प्राप्त होत नाही कारण अहंकाराने सुख दु:ख मिळते .दु:ख होण्याचे मूळ कारण आपला अहंकार दुखावला जातो .मी माझे आणी मला ह्या सर्वातून फक्त दु:ख च मिळते .अहंकाराने ज्ञान अंगी बाणत नाही .वाद उत्पन्न होतो . दु:ख वाढते .देहाभिमानाने अनेक विकल्प होतात .मोह उत्पन्न होतो .प्रपंच व परमार्थ दोन्ही साधत नाहीत . जीव भाव दृढ होतो .देहाभिमानाने संसार व जीवभाव निर्माण झाल्याने दु:ख होते .प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधत नाही .त्यामुळे ज्ञानी माणसाने काही सांगितले तरी पटत नाही .बोललेले ज्ञान फुकट जाते .त्यासाठी या अहंकाराला ओळखायला शिका असा संदेश समर्थ या श्लोकातून देतात .आपल्यात अहंकार कोणत्या गोष्टीचा आहे हे जर आपण ओळखायला शिकलो तरच त्यांचा त्याग कसा करता येईल ते बघता येईल
हा अहंकार आला कोठून असा विचार केला तर हे लक्षात येईल की ब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण झाले एको हं बहुस्याम ,ते ब्रह्माचे मी हे स्फुरण मलीन झाले आणि जीवापर्यंत पोहोचले . या अहंकारावर मात करण्याचा सोपा उपाय म्हणजे मी कर्ता नाही ,रामच कर्ता असे मानणे व तसे वागणे .