Friday, August 19, 2011

श्लोक ८६

II श्रीराम समर्थ ||
मुखी राम विश्राम तेथेचि आहे।
सदानंद आनंद सेवोनि आहे॥
तयावीण तो शीण संदेहकारी।
निजधाम हे नाम शोकापहारी॥८६॥

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

lochan kate said...

श्लोक ८६...
मुखी राम विश्राम तेथेचि आहे |
सदानंद आनंद सेवुनि राहे ||
तया वीण तो शीण संदेह कारी |
निज धाम हे नाम शोकापहारी ||८६||
हिन्दी में .....
मुख में राम विश्राम वही पर बसे है |
सदानंद आनंद सेवा में रत है ||
उसके बिना तो संदेह कारी|
निजधाम ये नाम शोकापहारी ||८६||
अर्थ.....
श्री राम दास जी कहते है कि हे मानव मन ! जिसके मुख में श्री राम का नाम है उअसका मन शांत है , उसे विश्रांति प्राप्त है | जीवन में सम्पूर्ण आनंद सेवा करने से ही मिलता है | श्रीराम के नाम स्मरण बिना जीवन एक संशय उत्पन्न करने वाली थकान होती है |स्वयं का घर जो हमारा विश्रांति स्थान है | राम नाम के कारण दु:खों से दूर रहता है अर्थात् श्रीराम का नाम स्मरण करने से दु:ख समाप्त होते है | यही जीवन का सत्य है |

suvarna lele said...

मुखाने राम नाम घेतले की रामाचे रूप डोळ्यासमोर उभे राहते .रामाने केलेला पराक्रम ,श्रीरामांचे गुण आठवतात त्यांचे एकपत्नीव्रत ,त्यांचा एकवचनी ,एकबाणीपणा ,लक्षात येतो .त्यांचे नाम ही आनंद्कारी असल्यामुळे चित्तात समाधान निर्माण होते . सर्व प्रकारचे ताप श्रीरामांची ईच्छा म्हणून स्वीकारायची मनाची तयारी होते .एक प्रकारचे समाधान प्राप्त होते .एक प्रकारचे तेज निर्माण होते .चित्त शुध्द होते .रामकृपा होते .आपल्या सुखाचा ठेवा श्रीरामच आहेत याची खात्री पटते .
अशी एक अवस्था येते की श्रीरामांचे नाम घेतल्या शिवाय जीवाला चैन पडत नाही ,श्रीरामांच्या नामाशिवाय सर्व गोष्टी संदेह निर्माण करणा-या असतात .,अशांती देणा-या असतात याची जाणीव होते .असे हे शोक ,दु:ख नाहीसे होते