Friday, August 30, 2013

श्लोक १८९

।। श्रीराम समर्थ ।।

मही निर्मिली देव तो ओळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे।
परी संग सोडुनि सुखे रहावे॥१८९॥

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

suvarna lele said...

खरा देव कोणता हे सांगताना समर्थ म्हणतात ,’माही निर्मिली देव तो वोळखावा ‘ ज्याने मायेच्या योगाने ही सृष्टी रचना केली तोच देव आहे असे ओळखावे .त्याला पाहता आले तर जीवाच्या मागे लागलेली संसारपीडा संपते व मोक्ष प्राप्त होतो .सृष्टी म्हणजे देव नाही .सृष्तीत्तील एखादा पदार्थ जर कल्पनेने मानला तर तो काल्पितच फळ देतो .मोक्षरुपी अक्षय फळ प्राप्त करून घ्यायचे असेल तर जीवाने त्रिगुण ,कल्पनेच्या पलीकडे असलेला देव ओळखयला हवा
निर्गुण देव या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे .म्हणजेच सगुणात निर्गुण व्यापून आहे .म्हणून सगुण भजन टाळता कामा नये
निर्गुणाचे सगुण प्रतिक म्हणजे सद्गुरू असतात .सद्गुरू सगुण अवस्थेत असतात पण अंतर्यामी निर्गुणाशी एकरूप झालेले असतात .विदेही अवस्थेत निर्गुणाशी अनन्य असायला हवे ,देह्भान असाताना रामभजनात रंगून जायला हवे .त्यासाठी कर्ता राम नव्हे मी आपण | अशी सगुण निवेदनाची व्याख्या समर्थ करतात .सगुण आत्मनिवेदन करता करता आत्मचैतन्याशी एकरूप होऊन जावे असे समर्थ म्हणतात .




lochan kate said...

श्लोक १८९....
मही निर्मीली देव तो ओळखावा |
जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ||
तया निर्गुणा लागि गुणी पहावे |
परी संग सोडूनि सुखी रहावे ||१८९||
हिन्दी में......
महि निर्मित भगवान को तुम जानो |
जिसे देखते ही मोक्ष तुम पाओ ||
उस निर्गुण के गुणो को तुम देखो |
पर दु:संग छोड के ही सुख परखो ||१८९||
अर्थ..... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! ब्रह्मा द्वारा निर्मित देव [भगवान] अर्थात उस संत को पहचानने का प्रयास करना चाहिये | जिसको देखते ही उसकी छत्र छाया में आने से जीवन को मोक्ष प्राप्त हो सके | उस निर्गुण परब्रह्म स्वरुप को सगुण स्वरुप में देखनें का प्रयास करना चाहिये | परन्तु दु:संग छोडकर रहना चहिये जिससे अपने जीवन को सार्थक कर सके |
Like?
Quote