Friday, March 4, 2011

श्लोक ६२

II श्रीराम समर्थ II

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला |
बळे अंतरी शोक संताप ठेला ||
सुखानंद आनंद भेदे बुडाला |
मनी निश्चयो सर्व खेदे उडाला ||६२||

डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण

जय जय रघुवीर समर्थ !

2 comments:

Kalyan Swami said...

As stated by Lochan Kate ( Gwaliar )[ हिन्दी मे ]
निजध्यास जो है टूटता ही जाता |
जबर शोक मन मे संताप रहता ||
सुखानंद आनंद का भेद सरता |
मन निश्चयों के सारे भेदों से भरता ||६२||
अर्थ... श्री रामदास जी कहते है कि हे मनुष्य मन ! जिसके मन में श्रीराम के प्रति एकाग्र प्रव्रुत्ति की आस्था का अंत हो जाता है जिसके कारण उसमे परमेश्वर के प्रति श्रध्दा की भावना लुप्त हो जाती है | फ़िर जबरन कार्य करवाने से मन में दु:ख तथा संताप होता है जिसके कारण मन में भेदभाव की प्रव्रुत्ति उत्पन्न होती है तथा ऐसी प्रव्रुत्ति से सुख के आनंद का अंत हो जाता है जिससे मन का निश्चय टूट जाता है और खेद करने की स्थिती बन जाती है और भक्ति की भावना का अंत हो जाता है |

suvarna lele said...

समर्थ हा श्लोक साधकासाठी देत आहेत साधकाला मी कोण ? देव कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतात .त्याचा निज ध्यासाचा अभ्यास चालू असतो .ज्ञान झालेले असले ,साधना चालू असली तरी त्याला काही संशय येत असतात ,ते निदिध्यासाने दूर होतात . अशा वेळेस जर त्याने वाद घातला तर त्याचे लक्ष अभ्यासातून उठते .निजध्यासात खंड पडतो व तेच त्याच्या शोक संतापाचे कारण ठरते .साधकाने आपण अमर ,अक्रिय .असंग ,साक्षी ,सच्चीदानंदरूप आहोत असा विचारांचा प्रवाह मनात ठेवणे व तो स्थिर करणे याला निजध्यास म्हणतात .पण साधक जेव्हा वादविवादात पडतो तेव्हा निजध्यासात खंड पडतो ..
वाद जेव्हा सुरु होतो ,वेगवेगळ्या वृत्ती उठू लागतात .अभ्यासाने कमी झालेली देहबुद्धी वाढू लागते .अभिमान वाढू लागतो .काम क्रोध मद मत्सर असे षड्रिपू वाढू लागतात .आणि शोक ,संताप वाढतो .त्यामुळे आनंदघन आत्म्याशी तादात्म्य पावणारा साधक ,साधन मार्गापासून दूर जातो .त्याचे अध:पतन होते .त्याचा निश्चय डळमळतो .आनंदसागरात विहार करणारा हा साधक दुखात लोटला जातो .