tag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post773258085833664348..comments2024-01-21T18:02:04.156+05:30Comments on समर्थ रामदास - साहित्य : श्लोक १८१ Kalyan Swami http://www.blogger.com/profile/08821565452313740246noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-54970582078246981662013-08-09T11:36:42.393+05:302013-08-09T11:36:42.393+05:30खरे ज्ञान कोणते, नेमके तेच या जगाला ठाऊक नसते, तर ...खरे ज्ञान कोणते, नेमके तेच या जगाला ठाऊक नसते, तर खरा सद्गुरू कळणं दुरापास्तच! कारण ग्रंथ कधी उघडून पाहिलेलेच नसतात व जे ग्रंथ उघडून पाहतात, त्यांना व्यवहारशून्य(!) म्हणून अवहेलतात. म्हणून असेच व्यवहारचतूर(?), कर्मदरिद्री लोक चेटूक करणा-या, कानात मंत्र देणा-या, ग्रंथ दूर सारून कर्मकांडांना प्राधान्य देणा-या, ज्ञान बाजूला ठेऊन केवळ सात दिवसांच्या कथा-किर्तनांची रेलचेल करणा-या, दानाच्या वस्तूंचा भोग म्हणून वापरणा-या अथवा दान म्हणून भक्तांकडून पंचतारांकीत भोगाच्या वस्तू उपाळणा-या, शिष्यांच्या तालावर चालणा-या, आपल्या सत्संगाशिवाय इतर सत्संगांची निंदा-नालस्ती करणा-या, शास्त्रतः त्याज्य विषयांची, कूसंगाची आवडीने जोपासना करणा-या भोंदू गुरूंच्या नादी लागतात.Anonymoushttps://www.blogger.com/profile/05986980899365997405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-37478566598082205882013-07-13T14:36:00.752+05:302013-07-13T14:36:00.752+05:30श्लोक १८१......
नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू |
न...श्लोक १८१......<br />नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू |<br />नव्हे निंदकू मत्सरु भक्ति मंदू ||<br />नव्हे उन्मतू वेसनी संग बांधू |<br />जगी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||१८१||<br />हिन्दी में.... <br />नही टोटके से प्राप्त द्रव्य रे भोंदू |<br />नही निंदा मत्सर से प्राप्त भक्ति संधू||<br />नही उन्मत्तता व्यसन संग बंधू |<br />जग ये ज्ञान का भण्डार है साधू ||१८१||<br />अर्थ.... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन !कितना बुद्धू है तू टोना टोटका करने से द्रव्य कभी भी प्राप्त नही किया जा सकता | निन्दा करके किसी का द्वेष , मत्सर करके कुछ भी प्राप्त नही होता | भक्ति हीन होकर या गलत संगत से व्यसनी बनकर उन्मुक्त होकर कुछ भी प्राप्त नही होता | इस नश्वर संसार में जो ब्रह्मज्ञानी है वही आगे साधू संत कहलाता है | इसलिये हे मानव ! द्वेष छोडकर ज्ञान प्राप्त करनें के लिये प्रयत्न करना चाहिये और अपना जीवन सार्थक करना चाहिये |<br />lochan katehttps://www.blogger.com/profile/16403239198792263722noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-37487340939870694502013-07-07T17:47:26.311+05:302013-07-07T17:47:26.311+05:30सद्गुरू च्या ठिकाणी कोणताही अवगुण नसतो . तो अंगारे...सद्गुरू च्या ठिकाणी कोणताही अवगुण नसतो . तो अंगारे धुपारे करत नाही चेटके किंवा करणी करत नाही .चाळकू म्हणजे चाळविणारा किंवा फसविणारा नसतो . थापा मारून कोणाला फसवत नाही .कोणाकडून पैसे उकळत नाही .कोणाची निंदा करत नाही .कोणाचा मत्सर करत नाही .भक्तिहीन असत नाही .परमेश्वरावर त्याचे नितांत प्रेम असते .तो उन्मत्त नसतो .सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी त्याचा भगवद्भाव असतो .त्याला स्वस्वरूपाचे ज्ञान असते .तो अंतर्बाह्य निर्मळ असतो .सदासर्वदा नम्र असतो .त्याला कोणतेही व्यसन नसते .त्याची संगत कधीही बाधक होत नाही .हानिकारक होत नाही .<br /><br /><br />suvarna lelehttps://www.blogger.com/profile/11156252283324612159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-37966691405738320792013-07-06T22:22:09.439+05:302013-07-06T22:22:09.439+05:30खरे ज्ञान कोणते, नेमके तेच या जगाला ठाऊक नसते, तर ...<i>खरे ज्ञान कोणते, नेमके तेच या जगाला ठाऊक नसते, तर खरा सद्गुरू कळणं दुरापास्तच! कारण ग्रंथ कधी उघडून पाहिलेलेच नसतात व जे ग्रंथ उघडून पाहतात, त्यांना व्यवहारशून्य(!) म्हणून अवहेलतात. म्हणून असेच व्यवहारचतूर(?), कर्मदरिद्री लोक चेटूक करणा-या, कानात मंत्र देणा-या, ग्रंथ दूर सारून कर्मकांडांना प्राधान्य देणा-या, ज्ञान बाजूला ठेऊन केवळ सात दिवसांच्या कथा-किर्तनांची रेलचेल करणा-या, दानाच्या वस्तूंचा भोग म्हणून वापरणा-या अथवा दान म्हणून भक्तांकडून पंचतारांकीत भोगाच्या वस्तू उपाळणा-या, शिष्यांच्या तालावर चालणा-या, आपल्या सत्संगाशिवाय इतर सत्संगांची निंदा-नालस्ती करणा-या, शास्त्रतः त्याज्य विषयांची, कूसंगाची आवडीने जोपासना करणा-या भोंदू गुरूंच्या नादी लागतात.<br />म्हणून खरे ज्ञान आपणच शोधून पहावे. ग्रंथ धुंडाळावे, संत चरित्रे वाचावीत. चरित्रांमधील चमत्कारांनी भाळून न जाता संतांनी सांगितलेल्या ज्ञानाची गोडी चाखावी. तेच ज्ञान ज्याच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकावयास मिळते, तोच खरा गुरू जाणावा. अहो! नेहमी खरे बोलावे, कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये, संसार सुखाचा करावा, मुखात सर्वदा ईश्वराचे नाव राहू द्यावे, मग तो ईश्वर तुम्हाला सुखी ठेवेल, तुम्हाला मूलं-बाळं होतील, तुमच्या मूलांची लग्न होतील अशी भंपक वाक्ये तर कोणी राजकारणी अथवा गल्लीतला चोर देखील सांगेल. मग त्याला आपण संत मानू का? आत्मज्ञानाला काही किंमत आहे की नाही? असे चव्हाट्यावर का ते वाटले जाते?</i>समर्थदासnoreply@blogger.com