tag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post6365537037085507258..comments2024-01-21T18:02:04.156+05:30Comments on समर्थ रामदास - साहित्य : श्लोक १७४Kalyan Swami http://www.blogger.com/profile/08821565452313740246noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-57775804729054670112013-05-21T16:46:44.386+05:302013-05-21T16:46:44.386+05:30शाश्वत देव पाहू गेल्यास तो साध्या डोळ्यांना दृष्टी...शाश्वत देव पाहू गेल्यास तो साध्या डोळ्यांना दृष्टीस पडत नाही. दिसतं ते केवळ जग. म्हणूनच जीवमात्र या दृश्य जगात भ्रम पावतात. कारण हे दृश्य जग खोटे आहे म्हणून नाहिसे करू पहावे, तर ते खरे वाटते. पहा ना जग जर खोटे आहे तर मग भूक खोटी आहे का, धर्म खोटा आहे का, नीती खोटी आहे का, देव काय खोट्याचे नियंत्रण करतो का? त्यास खरे मानावे, तर तेथे देव दिसत नाही आणि सुख, दु:ख, लोभ, मोहाने माणूस ग्रासतो. <br /> त्रिगुणांचा खेळ बाजूला ठेवून जग पाहू गेले असता समजते की जग हे परमात्म्याइतकेच सत्य आहे, फक्त परिवर्तनीय, क्षयी आहे. मात्र परमात्मा क्षय, अक्षयाच्या संकल्पनाच्याही पलीकडे आहे. त्यामूळे तोच अक्षय असे मोक्षसुख प्रदान करू शकतो. तो सर्वांतर्यामी साक्षीपणाने स्थित असल्यामुळे आपल्या सर्वसमर्पित भक्ताची काळजी तो दक्षतेने घेतो. मायिक भावनांमध्ये हेलपाटे खाणार्या आपल्या ज्ञानी भक्ताच्या सादेला तो दयाळू दुर्लक्षित करत नाही, तर आपले निजपदच त्या विवेकी, दृढनिश्चयी भक्ताला बहाल करतो. प्रकृतीच्या कार्यात कधीही ढवळाढवळ न करणारा तो आपलेच नियम धाब्यावर बसवून भक्तासाठी धावून येतो.समर्थदासnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-72017544761211554232013-05-21T10:55:50.423+05:302013-05-21T10:55:50.423+05:30देहबुद्धी नष्ट झाली की आत्मदर्शन घडते .अहंकार असता...देहबुद्धी नष्ट झाली की आत्मदर्शन घडते .अहंकार असताना या आत्मदेवाचे दर्शन घडत नाही .चर्मचक्षूंनी त्याला पाहता येत नाही . मला जन्ममरण आहे ही कल्पना देहबुद्धी मुळे असते . म्हणजेच जीवदशेमुळे असते पण एकदा आत्मारामाची भेट झाली की जीवदशा नाहीशी होते. मग आत्माराम हेच माझे स्वरूप आहे अशी खात्री पटते .अहंकार विरहित देहभान असते .एकांतात आत्मारामाशी तद्रूप होतो आणि लोकांत गलबल्यात सामील होतो पण आत्मारामाशी असलेले अनुसंधान सुटत नाही .मग भक्त आत्मनिवेदन भक्ती साधतो .आत्मनिवेदन भक्तीमुळे आक्षै मोक्ष म्हणजे अविनाशी ,निर्भय अशी सायोज्यमुक्ती देतो . संसार विरक्ती ,सायुज्यमुक्ती ,भगवतशक्ती मिळवतो . <br /><br /><br /><br />suvarna lelehttps://www.blogger.com/profile/11156252283324612159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-24106407002492364452013-05-17T14:58:07.192+05:302013-05-17T14:58:07.192+05:30श्लोक १७४....
जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना |
भवा...श्लोक १७४....<br />जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना |<br />भवां भक्षिता रक्षितां रक्षवेना ||<br />क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो |<br />दया दक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो ||१७४||<br />हिन्दी में...<br />जेसे चक्षु से लक्ष पते ना आता |<br />उसे इस जगत में जीना ना आता ||<br />क्षयातीत वो अक्षयी मोक्ष देता |<br />दया दक्ष वो साक्षी से पक्ष लेता ||१७४||<br />अर्थ.... श्री समर्थ रामदास जी कहते है कि हे मानव मन !जिसकी आंखे लक्ष पाने में असमर्थ हो उसका संसार में लोग नाश करते रहते है और वह अपनी रक्षा नहीं कर पाता | अनंत काल के प्रवास के समय पर अर्थात् अंत समय में दया रुपी पक्ष को साक्षी मानकर उस थोडे समय में भी वह परमेश्वर मनुष्य को मोक्ष प्रदान करता है | अत: हे मानव उस पर्मेश्वर का नित्य ध्यान कर एवं अपने जीवन को सार्थक कर | lochan katehttps://www.blogger.com/profile/16403239198792263722noreply@blogger.com